
Category: महाराष्ट्र

छावा – धर्मवीर संभाजी महाराजांची अखंड गाथा भाग ४ – येसूबाई : धर्मवीराची सावली, शौर्याच्या सहजीवनाची साक्ष.
लेखक: सचिन मयेकर | छावा मराठी विशेष लेखमाला प्रस्तावना रणांगणात शत्रूंचा संहार करणारा सिंह… घरात मात्र प्रेमळ, जिवलग, समर्पित पती. ही दुहेरी ओळख ज्यांनी आपुलकीने स्वीकारली, त्या होत्या – येसूबाई. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, राजकीय बुद्धिमत्ता, धर्मनिष्ठा साऱ्या इतिहासाने मान्य केल्या आहेत. पण त्यांच्या आयुष्यातील एक असा कोपरा आहे जो फारसा चर्चिला जात नाही –…

छावा – धर्मवीर संभाजी महाराजांची अखंड गाथा भाग ३ – धार आणि शब्दांची मैत्री!
आंतरराष्ट्रीय मैत्री दिन विशेष लेख लेखक: सचिन मयेकर | छावा मराठी प्रस्तावना- मैत्री म्हणजे संकटातही न सोडणारी साथ, शब्द आणि तलवार एकत्र झुंजणारी निष्ठा! आज ३० जुलै, आंतरराष्ट्रीय मैत्री दिन. या दिवशी ‘मैत्री’ या शब्दाला योग्य मान दिला जातो. पण मैत्री म्हणजे केवळ सोशल मीडियावर ‘स्टेटस’ टाकणं नाही, ती म्हणजे संकटातही सोबत उभी राहणारी ताकद….

आई-वडिलांच्या छायेत वाढलेला राजा!- छावा
छावा – भाग २ छावा मराठी विशेष लेखमाला लेखक – सचिन मयेकर, छावा मराठी प्रस्तावना ज्याचं आयुष्य रणात गेलं, त्याचं बालपण मात्र आठवणींच्या वासरात हरवलेलं होतं… छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य आपण सर्वजण जाणतो, पण त्या पराक्रमी राजाचं मन आईच्या मायेच्या शोधात आणि वडिलांच्या सावलीत घडत होतं, हे फार कमी जणांना माहीत आहे. लहान संभाजी…

छावा – धर्मवीर संभाजी महाराजांची अखंड गाथा
भाग १ – पुरंदरवरून उगवलेला सूर्य(बालपण, शिक्षण, विद्वत्ता) छावा मराठी विशेष लेखमाला लेखक – सचिन मयेकर, छावा मराठी प्रस्तावना: ज्याचं नाव घेतलं की मस्तक झुकतं, ज्याचं बलिदान आठवलं की रक्त खवळतं, तो म्हणजे आपला ‘छावा’ – धर्मवीर संभाजी महाराज! ‘छावा मराठी’ तर्फे आजपासून सुरू होत आहे एक ऐतिहासिक लेखमाला – छावा – धर्मवीर संभाजी महाराजांची…

अलिबाग दुर्घटना | तीनही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह आढळले; समुद्राने आणखी तिघांवर काळाचा घाला घातला
अलिबाग, २९ जुलै २०२५ (छावा प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी (२६ जुलै) मासेमारीसाठी गेलेली ‘तुळजाई’ नावाची बोट पलटी झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन मच्छिमारांचे मृतदेह सोमवारी (२८ जुलै) अखेर आढळून आले. समुद्रात बेपत्ता झालेल्यांपैकी नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा) आणि मुकेश यशवंत पाटील या तिघांचे मृतदेह अनुक्रमे सासवणे, किहीम आणि दिघोडे किनाऱ्यावर…

दैवज्ञ समाजाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात प्रारंभ – श्रीमारुती मंदिरात हरिनामाचा गजर!
छावा मराठी न्यूज पोर्टल- सचिन मयेकर- दि.२९ जुलै दैवज्ञ समाजाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला दिनांक २९ जुलै २०२५ पासून श्रीमारुती मंदिर, रेवदंडा येथे भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या धार्मिक पर्वाचे आयोजन समाजातील ऐक्याचे प्रतीक मानले जाते. दिवसभर हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन अशा विविध अध्यात्मिक कार्यक्रमांनी श्रद्धाळू मंत्रमुग्ध होत आहेत. श्री…

चौल रामेश्वर मंदिराजवळील पुष्करणीमध्ये पावसाळी जलमहोत्सव; बालगोपाळ आणि तरुणाईचा उत्साह शिगेला
छावा –चौल| सचिन मयेकर |२९ जुलै २०२५ चौल येथील ऐतिहासिक श्री रामेश्वर मंदिराजवळील प्राचीन पुष्करणी (पाणवठा) यंदा वेळेपूर्वीच पाण्याने भरली असून, ती स्थानिकांसाठी जलक्रीडेचे केंद्र ठरली आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्याने, ही पुष्करणी लवकरच पाण्याने भरली आणि त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक लवकरच पोहण्यासाठी सज्ज झाली होती. सध्या परिसरातील बालगोपाळ आणि तरुणाई मनसोक्त जलक्रीडेचा आनंद…

रायगडमध्ये समुद्रात मोठी दुर्घटना – खांदेरी किल्ल्याजवळ मासेमारी बोट बुडाली, ५ जणांचा जीव वाचला, ३ जण बेपत्ता – शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू
रायगड – छावा मराठी, सचिन मयेकर रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक खांदेरी किल्ल्याजवळ आज सकाळी मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे. बोटीत एकूण ८ मच्छीमार होते. त्यातील पाच जणांनी पोहत किनाऱ्यावर येत आपला जीव वाचवला आहे, तर उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध…

तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर
आज, २६ जुलै — कारगिल युद्धाचा २६ वा स्मृतिदिन! ज्या रणभूमीत भारतीय शूरवीरांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले, त्या वीरांना “छावा – मराठी डिजिटल न्यूज नेटवर्क” व SMNEWS मराठी न्युज चॅनेल तर्फे वीरांना मानाचा सलाम! व मानाचा मुजरा! तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर लेखक – छावा – सचिन मयेकर…

श्रावण: सात्त्विकतेचा सुगंध, भक्तीचा संकल्प.
‘छावा’ संपादकीय | दि. २५ जुलै | सचिन मयेकर पावसाच्या सरींनी निसर्ग हरित झाला आहे. नदी, नाले, डोंगर, झाडं, पक्षी आणि वातावरण नवजीवनाने बहरलेलं आहे. आणि अशा या निसर्गाच्या पुनर्जन्माच्या पार्श्वभूमीवर हिंदू संस्कृतीत सर्वाधिक पवित्र मानला जाणारा ‘श्रावण मास’ आजपासून सुरू होतोय. श्रावण हा केवळ एक महिना नसून शुद्ध सात्त्विक जीवनशैलीचा आरंभ, मनाला संयमात ठेवण्याचा…