
Category: महाराष्ट्र

जागतिक दर्जाची शिक्षणक्रांती आता भारतात…!
• “परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार” • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक दिलाचा • छावा • मुंबई, दि १४ जून • विशेष प्रतिनिधी भारतातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाने पाच नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत आशयपत्रे स्वाक्षरी करून नवी मुंबईत जागतिक शैक्षणिक हब उभारण्याची घोषणा केली….

लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे
• छावा • अमरावती, दि. १४ जून • वृत्तसंस्था शेतकरी, दिव्यांग तसेच इतर उपेक्षित घटकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आमदार बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र आंदोलकांना सुपूर्त केल्यानंतर कडू यांनी उपोषण…

बच्चू कडू यांच्या उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद
• शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन होणार • पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा • छावा • अमरावती, दि. १३ जून • विशेष प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज निर्णायक वळण मिळाले. गुरुकुंज मोझरी येथे आंदोलनस्थळी आलेले राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सरकारच्या वतीने…

महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा नवा अध्याय
• नागपुरात उभारणार हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प • ₹८,००० कोटींची गुंतवणूक, २,००० रोजगार संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेससोबत सामंजस्य करार • छावा • नागपूर, दि. १३ जून • वृत्तसंस्था नागपूरमध्ये सुमारे ₹८,००० कोटींची गुंतवणूक करत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. कंपनी हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

रायगडमध्ये ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’
• १६ ते ३० जूनदरम्यान जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये सेवा शिबिरे • जिल्हाधिकारी किशन जावळे यांची पत्रकार परिषदेत माहिती • छावा • अलिबाग, दि १३ जून • प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात सुरू असलेल्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात १६ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत ११३ आदिवासी गावांमध्ये…

पूर नियंत्रण रेषा नव्याने निश्चित करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
• छावा • मुंबई, दि १३ जून • प्रतिनिधी राज्यातील नद्यांच्या किनाऱ्यालगत अनेक ठिकाणी दीर्घकाळ पूरस्थिती उद्भवलेली नसतानाही, सध्याची पूर नियंत्रण रेषा विकासाला अडथळा ठरत असल्याने ती नव्याने ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करून मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध…

गुरु-ता-गद्दी व शाहिदी शताब्दी समागम
• मुख्यमंत्र्यांकडून समागमाच्या यशासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही • राज्यस्तरीय समितीची वर्षा निवासस्थानी बैठक • छावा • मुंबई, दि १३ जून • प्रतिनिधी गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शाहिदी वर्षानिमित्त आणि श्री गुरु गोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या गुरु-ता-गद्दी समागमाच्या निमित्ताने राज्यात तीन ठिकाणी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नांदेड, नागपूर व नवी मुंबई…
विमान कोसळलं, त्याच इमारतीत झोपली होती, अकोल्याच्या तरुणीचा कसा वाचला जीव? थरारक कहाणी समोर
छावा • अहमदाबाद,ता. १३ जून • प्रतिनिधी अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये झोपलेली असताना विमानाचा आवाज ऐकून ती जागी झाली आणि धुरातून सुरक्षित बाहेर पडली.गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून २०२५) भीषण विमान अपघात झाला. या विमान अपघातामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एअर इंडियाचं विमान (एआय १७१)…

रेवदंडा अपघात
• दूध सोसायटी व शिधा केंद्र संरचनेचे नुकसान • मध्यरात्री वाहनाची धडक ; चालक पसार • छावा • रेवदंडा, ता. १३ जून • प्रतिनिधी रेवदंडा येथील सहकारी दूध तथा शासकीय शिधा वाटप केंद्राच्या इमारतीस मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. सदर घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सदर अपघातामध्ये इमारतीच्या बाहेरील भिंतीचे…

AI-171 विमान अपघात
• राज्य शासनाचा मदत कक्ष सक्रिय • छावा • मुंबई, दि. १२ जून • प्रतिनिधी अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या आंतरराष्ट्रीय विमानाचा गंभीर अपघात झाल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत किती प्रवासी जखमी झाले किंवा हताहत झाले याबाबत तपशील समोर येत असतानाच, प्रशासकीय स्तरावर तात्काळ कृती आणि मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या…