
Category: महाराष्ट्र
भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज
महायुतीला घरातील नेत्याचाच आहेर अखंड शिवसेनेच्या पुनर्स्थापनेसाठी ठाकरे बंधूसह शिंदेंनाही गजानन कीर्तिकरांची भावनिक साद मुंबई | छावा, दि.०७, वृत्तसंस्था | “भाजप आणि काँग्रेस विरहित शिवसेना हीच महाराष्ट्राची गरज आहे.” असे वक्तव्य करत गजानन कीर्तिकर यांनी महायुतीला घरचाच आहेर दिला आहे. या त्यांच्या कृतीमुळे शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कधीकाळी…
अवघा रंग शिवमय झाला
दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न शिवप्रेमींच्या घोषणांनी गड दुमदुमला; महाराजांच्या आठवणींना उजाळा अलिबाग (विशेष प्रतिनिधी, दि. ०६ जून) युगपुरुष, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन दुर्गराज रायगडावर अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात आला. किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. याप्रसंगी छत्रपती संभाजी…
शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरु
अमरावती (वृत्तसंस्था, दि. ०६ जून) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अचलपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गनिहाय रिक्त असणाऱ्या आरक्षित जागांनुसार समाजातील अनु.जाती, अनु.जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थी…
कृष्णकुंज हे आमचे दुसरे घर
संजय राऊतांची राजकीय सॉफ्ट डिप्लोमसी राज-उद्धव युतीचा संभाव्य सूर मुंबई (वृत्तसंस्था, दि.०६ जून) “मातोश्रीनंतर कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचे घर हे आमचं दुसरं घर आहे”, असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्रात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य युतीच्या चर्चा पुन्हा…
शिवराज्याभिषेक : प्रेरणादायी सुवर्ण घटना
आजचा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिन आहे. रायगडाच्या सिंहासनावर आज पुन्हा एकदा इतिहासाचे तेज झळाळून निघाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही केवळ ऐतिहासिक घटना नसून, ती एक स्फूर्ती देणारी चिरंतन प्रेरणा आहे. ०६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर झालेला हा सोहळा भारतीय स्वराज्याच्या स्थापनेचा सुवर्णक्षण ठरला. राज्याभिषेक हा केवळ एक शासकीय…
बळीराजासाठी आनंदवार्ता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता २० जून रोजी होणार वितरित ई-केवायसी, आधार सीडिंग प्रक्रियेची पूर्तता आवश्यक : जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन रत्नागिरी (वृत्तसंस्था, ५ जून) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील २० वा हप्ता लाभार्थ्यांना २० जून २०२५ रोजी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी पात्र…
सुधाकर बडगुजर यांना निरोपाचा नारळ
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा ॲक्शन मोड पक्षविरोधी कारवायांचा ठपका मुंबई (वृत्तसंस्था, ५ जून) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या नाशिक जिल्हा उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई बडगुजर यांनी २ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये भेट घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या…
महाराष्ट्र लोकोपयोगी कायदे तयार करण्यात देशात अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई/गोंदिया (वृत्तसंस्था, ४ जून) “महाराष्ट्र हे सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे तयार करण्यातही महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्रात तयार झालेल्या कायद्यांचे अनुकरण केवळ देशातील इतर राज्येच नव्हे, तर अनेक परदेशांद्वारे देखील करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. विधी व न्याय विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सह्याद्री अतिथीगृह…
साळाव – रोहा मार्गावरील प्रवास बनला धोकादायक
अलिबाग (विशेष प्रतिनिधी, दि. ०५ जून) – मुरूड – रोहा तालुक्यातील महत्वाचा प्रवास मार्ग असणारा साळाव – रोहा मार्गावरील प्रवास स्थानिक तसेच प्रवासी यांच्यासाठी धोकादायक बनला असून, दिवसेंदिवस तो अधिक असुरक्षित होत असल्याचा आक्रोश जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम आता स्थानिकांसह प्रवासांना डोकेदुखीचे सिद्ध होत असले तरी, या कामाच्याबाबतही नेहमीप्रमाणे बांधकाम विभाग कासवाच्या…

‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा, 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी..
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपिट होण्याची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि…