
Category: महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’ जारी
• आज दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन • छावा • अलिबाग दि.१६ जून • प्रतिनिधी हवामान विभागाने (IMD) रायगड जिल्ह्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात काही…

वडिलांच्या स्मृतीतून समाजसेवेचा दीप
• दोन तरुणांचा भावनिक सामाजिक उपक्रम • पितृदिनाची अर्थपूर्ण सांगता • छावा • रेवदंडा, दि. १५ जून • प्रतिनिधी पितृदिन म्हटलं की अनेकांच्या मनात आठवणी दाटून येतात. कोणी स्मरणरूपी कार्यक्रम घेतात, तर कोणी धार्मिक विधी करतात. मात्र, रेवदंड्यातील दोन तरुणांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतींना कृतीतून आदरांजली अर्पण करत, सामाजिकतेचा अनोखा आदर्श समोर ठेवला. ओएसिस…

वारकऱ्यांच्या सेवेत महाराष्ट्र शासन
• आषाढी वारीसाठी शासनाची महत्त्वपूर्ण घोषणा • ११०९ दिंड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान • छावा • पुणे, दि. १४ जून • वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाने आषाढी एकादशी वारी २०२५ साठी मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या मानाच्या १० पालख्यांसोबतच्या एकूण १,१०९ दिंड्यांना प्रत्येकी ₹२०,००० इतके अनुदान वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील…
आता दिवस पावसाचे! मुसळधार पाऊस कोसळणार, 23 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
छावा • मुंबई, दि. १४ जून • वृत्तसंस्था राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. पाहुयात 15 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.राज्यात जोरदार पाऊस आजही पाहायला मिळाला. 15 जूनसाठी देखील राज्यातील विविध भागांना हवामान विभागाने जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात…

जागतिक दर्जाची शिक्षणक्रांती आता भारतात…!
• “परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार” • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासदर्शक दिलाचा • छावा • मुंबई, दि १४ जून • विशेष प्रतिनिधी भारतातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाने पाच नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत आशयपत्रे स्वाक्षरी करून नवी मुंबईत जागतिक शैक्षणिक हब उभारण्याची घोषणा केली….

लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे
• छावा • अमरावती, दि. १४ जून • वृत्तसंस्था शेतकरी, दिव्यांग तसेच इतर उपेक्षित घटकांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आमदार बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज लेखी आश्वासनानंतर संपुष्टात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र आंदोलकांना सुपूर्त केल्यानंतर कडू यांनी उपोषण…

बच्चू कडू यांच्या उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद
• शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन होणार • पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा • छावा • अमरावती, दि. १३ जून • विशेष प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज निर्णायक वळण मिळाले. गुरुकुंज मोझरी येथे आंदोलनस्थळी आलेले राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सरकारच्या वतीने…

महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा नवा अध्याय
• नागपुरात उभारणार हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प • ₹८,००० कोटींची गुंतवणूक, २,००० रोजगार संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेससोबत सामंजस्य करार • छावा • नागपूर, दि. १३ जून • वृत्तसंस्था नागपूरमध्ये सुमारे ₹८,००० कोटींची गुंतवणूक करत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. कंपनी हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

रायगडमध्ये ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’
• १६ ते ३० जूनदरम्यान जिल्ह्यातील ११३ गावांमध्ये सेवा शिबिरे • जिल्हाधिकारी किशन जावळे यांची पत्रकार परिषदेत माहिती • छावा • अलिबाग, दि १३ जून • प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभरात सुरू असलेल्या ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत रायगड जिल्ह्यात १६ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत ११३ आदिवासी गावांमध्ये…

पूर नियंत्रण रेषा नव्याने निश्चित करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
• छावा • मुंबई, दि १३ जून • प्रतिनिधी राज्यातील नद्यांच्या किनाऱ्यालगत अनेक ठिकाणी दीर्घकाळ पूरस्थिती उद्भवलेली नसतानाही, सध्याची पूर नियंत्रण रेषा विकासाला अडथळा ठरत असल्याने ती नव्याने ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पूर नियंत्रणासाठी उपाययोजना करून मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध…