
पुणे शहरात नवा पर्यावरण प्रकल्प सुरू: ‘हरित पुणे’ अभियान.
पुणे, 21 मार्च 2025: पुणे महानगरपालिकेने शहरातील पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. ‘हरित पुणे’ अभियानाचा शुभारंभ आज महापौर श्रीमती भारती पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये पुणे शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण, हरित पट्ट्यांची निर्मिती आणि कचऱ्याची विल्हेवाट यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. महापौर पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करतांना म्हटले, “पुणे…

‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा, 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी..
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपिट होण्याची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि…
रेवदंड्यात मानवी कवटीने काढले डोके वर
रेवदंडा (विशेष प्रतिनिधी, दि. ३० मे) अलिबाग तालुक्यातील रेवदंडामधील रेती बंदर म्हणून नामख्यात असलेले मोठे बंदर येथील परिसरात मानवी सापळा आढळल्याने शंका – कुशंकांचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी रेवदंडा पोलीस स्थानकाकडून नागरिकांना सौजन्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर हकीगत अशी की, ऐतिहासिक किल्ला असणारा हा परिसर नागरिकांसाठी अल्हाददायक विश्रांतीचा तसेच व्यायाम आणि पाय…
पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढला; दोन्ही बाजूंनी गोळीबार, पाककडून रणगाडे तैनात
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये बरमाच सीमेवर संघर्ष झाला. ड्युरंड लाईनवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे इस्लामाबाद/काबूल: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील संबंध बिघडत चालले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील तणाव वाढला असून बरमाचा सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. हा परिसर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला समांतर आहे….
अशोक काकांचे भाचीकडुन खास कौतुक
मुंबई – अशोक काकांचं भाचीकडून खास कौतुक’…दिल्ली मुंबई फ्लाईटमध्ये अविस्मरणीय अनुभव… ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. काल दिल्लीहून मुंबईला येत असताना अशोक सराफ यांच्या भाचीने अनौन्समेंट करत त्यांचे कौतुक केले. अदिती परांजपे ही निवेदिता सराफ यांच्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे. अदिती पायलट असून काल तिने तिच्या…
गेटवे ते मांडवा फेरी सेवा बंद
अलिबाग प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा) प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद राहणार आहे. ही सेवा २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत बंद आहे. मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर…
शेळीपालनाच्या नावाने काळा धंदा, मुंबई पोलिसांना भनक लागली अन् मोठा पर्दाफाश
कर्जतमधील एका फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये ड्रग्ज फॅक्ट्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या फार्म हाऊसमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय सुरू आहे, असे भासवून हा ड्रग्ज निर्मितीचा नको तो उद्योग सुरु होता. मुंबई : कर्जतमधील मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कशेळे हद्दीतील फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी…
रेवदंड्यात पोलिसांची धडक कारवाई दीड लाखांचा गांजा जप्त. श्वान पथकाची मदत..
रेवदंडा प्रतिनिधी – रेवदंड्यात गांजा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याप्रकरणी अर्चना आशिष तळेकर वय वर्ष ४१ तसेच आशिष नंदकुमार तळेकर यांचे वर गुन्हा रजिस्टर नंबर ७३ / १२५ कलम 3 /५ सह.एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम ८/क २० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी अर्चना आशिष तळेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे…
विहूर रस्त्यावर महाकाय वडाचे झाड कोसळले
सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली मुरुड (प्रतिनिधी) अलिबाग -मुरुड रस्त्यावर मोरे ते विहूर पेट्रोल पंप दरम्यान शेकडो वर्षे जुने असलेले महाकाय वडाचे झाड पहाटेच्या वेळेत रस्त्यावर आडवे कोसळले. यावेळेत वाहतूक तुरळक प्रमाणात असल्याने सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली. राज्यात गेले काही दिवसांपासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने मुरुडमध्ये अक्षरशः थैमान घातले.यामुळे नागरिकांची तारांबळ…
जयोस्तुते हा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र : दर्श नागोटकर यांचे प्रतिपादन
रेवदंडा (वार्ताहर/प्रतिनिधी) अखंड राष्ट्रासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पिणारे, बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी आणि कार्याने आजही अनेक पिढ्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत आहे आणि उद्याही मिळत राहणार आहे. जयोस्तुते हा फक्त शब्द नाही तर तो भारतमातेच्या स्वातंत्र्य कार्यातील आरंभलेल्या क्रांतीयज्ञाच्या समयीचा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र आहे, जो आजही नवचेतना देतो, असे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते तथा…

धाराशिव, रायगड जिल्ह्याची जबाबदारी दोन लेडी सिंघमकडे
रेवदंडा (सचिन मधुकर मयेकर ) धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ति झाली आहे. सिंघम अधिकाऱ्यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची नियुक्ती झाली आहे. तर रायगड…

‘ही’ रोड ट्रिप तुमच्या कुटुंब आणि एकट्याने प्रवास करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय, तुमच्या आठवणींमध्ये राहील कायम
ज्यांना ऑफबीट किंवा थोडे वेगळे प्रवास करायला आवडते त्यांच्यासाठी भारतात असे अनेक मार्ग आणि डेस्टिनेशन आहेत जे एका अद्भुत रोड ट्रिपसाठी योग्य आहेत. देशातील काही सुंदर रोड ट्रिपबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.
- 1
- 2