Category: महाराष्ट्र
अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
चौल नाका, कुरुळ-नागाव परिसरात वाहतूक धोक्यात छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मोठ्या संकटाचे कारण ठरत आहे. खड्ड्यांमुळे गाड्या सतत आपटत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे….
![]()
संपादकीय भाग ४ -ज्यांनी स्मृती जपल्या – त्यांचं आपण काय केलं?
छावा, संपादकीय | दि. २० जुलै (सचिन मयेकर) रामदास बोट दुर्घटनेनंतर स्मारक, शासन आणि समाजाच्या प्रतिक्रियेचा लेखाजोखा मृत्यू लाटांमध्ये, स्मृती किनाऱ्यावर… १७ जुलै १९४७ रोजी समुद्रात बुडालेल्या ‘रामदास’ बोटीतून सुमारे ७०० हून अधिक जण कधीच परतले नाहीत. मात्र, त्यांची नावे परत आली – आठवणीतून, स्वप्नांतून, आणि कुठल्यातरी कोपऱ्यातल्या घरगुती देवघरातून. आज ७८ वर्षांनंतरही, ती घटना…
![]()
निजामपूरचं नवं नाव – आता रायगडवाडी
छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रायगड जिल्ह्यातील छत्रा–निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावात बदल करत आता रायगडवाडी हे नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची अधिकृत घोषणा विधानसभेत केली. ही फक्त एक नावबदलाची कारवाई नसून — इतिहास, अस्मिता, आणि स्वाभिमानाशी जोडलेली एक वैचारिक जाणीव आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी जिथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली,…
![]()
संपादकीय भाग ३ – कोण बुडालं? बोट की यंत्रणा? – ‘रामदास’ दुर्घटनेतील तांत्रिक दोषांचा अभ्यास
छावा, संपादकीय | दि. १९ जुलै(सचिन मयेकर) १७ जुलै १९४७ रोजी झालेली ‘रामदास’ बोट दुर्घटना ही केवळ निसर्गाचा कहर नव्हता. तो होता मानवनिर्मित चुकांचा एक साखळीप्रकार, जिथे बोटीची रचना, प्रशासनाची दुर्लक्ष आणि हवामान यांचा अपायकारक संगम झाला. बोटीची रचना आणि कमतरता ‘रामदास’ ही ९० फूट लांब, २४ फूट रुंद आणि ११ फूट खोल बोट होती….
![]()
गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक वृद्ध पादचारी महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) गोळा स्टॉपजवळ गुरुवारी (दि. १८ जुलै) एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथील ७७ वर्षीय मथुरा रामचंद्र वरसोलकर या रस्त्याने पायी जात असताना, पाठीमागून आलेल्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्या घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या. मथुरा वरसोलकर या रेवदंडा…
![]()
सलाम तुझ्या बहाद्दूरीला…
छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) सलाम तुझ्या बहाद्दूरीला… गेली का रे परत? एमएसईबी वाले काही करत नाहीत का? – असे आपण सहज म्हणतो… पण लाईट परत येते कशी? कोण आणतो ती? रेवदंडा गावातील या फोटोतील योद्ध्याकडे पाहा — सुमारे २८ फूट उंच पोलावर चढलेला, अंगावर धूप आणि डोक्यावर धोका… फक्त आपल्या घरात पुन्हा उजेड…
![]()
ब्रेकिंग अपडेट | गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक — बोर्ली गावातील वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत
छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोळा स्टॉपजवळ आज दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथे राहणाऱ्या मथुरा वरसोलकर (वय अंदाजे ७० वर्षे) या वयोवृद्ध महिलेला एमएच-२० बीएल-३९३३ क्रमांकाच्या स्वारगेट–मुरूड मार्गावरील एस.टी. बसने जोरात धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, धडकेनंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्या घटनास्थळीच जागीच…
![]()
संपादकीय भाग २ “मी पाहिलं, मी जगलो… आणि अनेक हरवले” — ‘रामदास’ बोटीतून परतलेल्या डोळ्यांनी सांगितलेली सत्यकथा
छावा- संपादकीय दि. १८ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी, समुद्राने स्वातंत्र्य हिरावून घेतलं — शेकडो जिवांचं. ‘रामदास’ नावाची बोट सकाळी ६.३० वाजता मुंबईहून रेवसच्या दिशेने निघाली. प्रवाशांमध्ये उत्साह होता – गटारीचा सण, कोकणची ओढ, कुणी नवविवाहित, कुणी घरी जाणारे विद्यार्थी, कुणी आप्तांची भेट घेणारे. पण कुणालाही माहित नव्हतं की, ही…
![]()
ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर: कमी मानधन, मोठी जबाबदारी – न्याय अजूनही दूर
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) गावाच्या डिजिटल रूपांतरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायतीतील डेटा ऑपरेटर (Computer Operator / VLE) अत्यल्प मानधनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. विविध शासकीय योजना, ऑनलाइन सेवा आणि ग्रामपंचायतीच्या रोजच्या प्रशासनासाठी या कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, एवढं सगळं करूनही त्यांना आजतागायत ना निश्चित वेतन आहे,…
![]()
रेवदंड्यात मुसळधार पावसाचा जोर — जनजीवनावर परिणाम
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा परिसरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज सकाळपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत चालू असलेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे. गावात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागरिक घरातच थांबण्यास प्राधान्य देत आहेत. शाळा आणि लहान व्यवसायांवर याचा परिणाम जाणवत आहे. तथापि,…
![]()

