
Category: महाराष्ट्र

ब्रेकिंग अपडेट | गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक — बोर्ली गावातील वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत
छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोळा स्टॉपजवळ आज दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथे राहणाऱ्या मथुरा वरसोलकर (वय अंदाजे ७० वर्षे) या वयोवृद्ध महिलेला एमएच-२० बीएल-३९३३ क्रमांकाच्या स्वारगेट–मुरूड मार्गावरील एस.टी. बसने जोरात धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, धडकेनंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्या घटनास्थळीच जागीच…

संपादकीय भाग २ “मी पाहिलं, मी जगलो… आणि अनेक हरवले” — ‘रामदास’ बोटीतून परतलेल्या डोळ्यांनी सांगितलेली सत्यकथा
छावा- संपादकीय दि. १८ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी, समुद्राने स्वातंत्र्य हिरावून घेतलं — शेकडो जिवांचं. ‘रामदास’ नावाची बोट सकाळी ६.३० वाजता मुंबईहून रेवसच्या दिशेने निघाली. प्रवाशांमध्ये उत्साह होता – गटारीचा सण, कोकणची ओढ, कुणी नवविवाहित, कुणी घरी जाणारे विद्यार्थी, कुणी आप्तांची भेट घेणारे. पण कुणालाही माहित नव्हतं की, ही…

ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर: कमी मानधन, मोठी जबाबदारी – न्याय अजूनही दूर
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) गावाच्या डिजिटल रूपांतरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायतीतील डेटा ऑपरेटर (Computer Operator / VLE) अत्यल्प मानधनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. विविध शासकीय योजना, ऑनलाइन सेवा आणि ग्रामपंचायतीच्या रोजच्या प्रशासनासाठी या कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, एवढं सगळं करूनही त्यांना आजतागायत ना निश्चित वेतन आहे,…

रेवदंड्यात मुसळधार पावसाचा जोर — जनजीवनावर परिणाम
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा परिसरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज सकाळपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत चालू असलेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे. गावात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागरिक घरातच थांबण्यास प्राधान्य देत आहेत. शाळा आणि लहान व्यवसायांवर याचा परिणाम जाणवत आहे. तथापि,…

राजे, तुम्ही व्हा पुढे… गर्जला बाजी..
छावा, संपादकीय | दि. १४ जुलै(सचिन मयेकर) १३ जुलै १६६०… स्वराज्याच्या इतिहासातील एक काळरात्र. काळजी, कट, आणि कुरघोड्यांनी व्यापलेला तो काळ. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आणि त्यांच्या पाठोपाठ सिद्दी जोहरची भलीमोठी फौज लागली होती — जवळपास सहा हजार सैनिकांचा गराडा. हा वेढा तोडायचा म्हणजे मृत्यूच्या मुखातून मार्ग काढायचा, आणि तेही फक्त निष्ठेच्या बळावर….

सर्वांच्या आठवणीत – बाबू – माणुसकीचं चाक फिरवत गेलेला माणूस
छावा रेवदंडा | १३ जुलै २०२५ (सचिन मयेकर) रेवदंडा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा आवाज आजही येतो, कामं सुरू आहेत, पण एक गोष्ट कायमची हरवली आहे – बाबू. सचिन उर्फ बाबू झावरे यांचं निधन होऊन सुमारे सात महिने होत आलेत. पण त्यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या माणसांशी असलेल्या नात्याची उब, अजूनही गावात प्रत्येक वळणावर अनुभवायला मिळते. बाबू हे नाव…

संपादकीय- अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक ..व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूप्रती कृतज्ञतेचा भाव
छावा, संपादकीय | दि. १० जुलै(सचिन मयेकर) भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परंपरेचा गौरव करणारा दिवस म्हणजे व्यास पौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाल्याचे मानले जाते, म्हणून त्यांना वंदन करण्याचा आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष…

रेवदंडा पारनाका येथे भरधाव नेक्सॉनची धडक – दोन गाड्यांचे मोठे नुकसान
छावा रेवदंडा | ९ जुलै २०२५ (सचिन मयेकर) मुरुडहून अलिबागच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली नेक्सॉन (MH06-CD-8879) ही चारचाकी गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट रेवदंडा पारनाका येथील नागावकर यांच्या घराखाली असलेल्या भाजी मंडईवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडी मागच्या बाजूने जोरात ग्रामपंचायतीचे दिशेने जाऊन दुकान गाळ्यावर आदळली.या अपघातात ग्रामपंचायतीच्या झेंडावंदनासाठी लावलेले लोखंडी पाईप…

रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; पाकिस्तानी खूण आढळल्याची चर्चा, संपूर्ण यंत्रणा सतर्क
छावा रेवदंडा | ७ जुलै २०२५ (सचिन मयेकर) रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथून तीन नॉटीकल मैल अंतरावर कोर्लई समुद्रात एक संशयित बोट दिसून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक संशय सुरक्षायंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर बोटीवर पाकिस्तानशी संबंधित खूण आढळल्याची चर्चा असून, यामुळे रेवदंडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना…

संपादकीय – किल्ल्यांवर कोरू नका नाव, मनात कोरा शिवरायांचा गौरव
छावा, संपादकीय | दि. ०७ जुलै(सचिन मयेकर) छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक युगपुरुष नव्हते, तर मूल्यांची उंची सांगणारा एक आदर्श होते. त्यांनी असंख्य किल्ले बांधले, शत्रूंपासून जिंकले आणि ते व्यवस्थित सांभाळले. पण या साऱ्या पराक्रमात एक बाब प्रकर्षाने दिसून येते त्यांनी कधीही स्वतःचे नाव कोणत्याही किल्ल्याला दिले नाही. हेच त्यांच्या विनयशीलतेचं, कार्यमूल्यांचं आणि लोकहितदृष्टीचं…