छावा – धर्मवीर संभाजी महाराजांची अखंड गाथा

भाग १ – पुरंदरवरून उगवलेला सूर्य(बालपण, शिक्षण, विद्वत्ता) छावा मराठी विशेष लेखमाला  लेखक – सचिन मयेकर, छावा मराठी प्रस्तावना: ज्याचं नाव घेतलं की मस्तक झुकतं, ज्याचं बलिदान आठवलं की रक्त खवळतं, तो म्हणजे आपला ‘छावा’ – धर्मवीर संभाजी महाराज! ‘छावा मराठी’ तर्फे आजपासून सुरू होत आहे एक ऐतिहासिक लेखमाला – छावा – धर्मवीर संभाजी महाराजांची…

Loading

Read More

अलिबाग दुर्घटना | तीनही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह आढळले; समुद्राने आणखी तिघांवर काळाचा घाला घातला

अलिबाग, २९ जुलै २०२५ (छावा प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी (२६ जुलै) मासेमारीसाठी गेलेली ‘तुळजाई’ नावाची बोट पलटी झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन मच्छिमारांचे मृतदेह सोमवारी (२८ जुलै) अखेर आढळून आले. समुद्रात बेपत्ता झालेल्यांपैकी नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा) आणि मुकेश यशवंत पाटील या तिघांचे मृतदेह अनुक्रमे सासवणे, किहीम आणि दिघोडे किनाऱ्यावर…

Loading

Read More

दैवज्ञ समाजाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात प्रारंभ – श्रीमारुती मंदिरात हरिनामाचा गजर!

छावा मराठी न्यूज पोर्टल- सचिन मयेकर- दि.२९ जुलै दैवज्ञ समाजाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला दिनांक २९ जुलै २०२५ पासून श्रीमारुती मंदिर, रेवदंडा येथे भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. या धार्मिक पर्वाचे आयोजन समाजातील ऐक्याचे प्रतीक मानले जाते. दिवसभर हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन अशा विविध अध्यात्मिक कार्यक्रमांनी श्रद्धाळू मंत्रमुग्ध होत आहेत. श्री…

Loading

Read More

चौल रामेश्वर मंदिराजवळील पुष्करणीमध्ये पावसाळी जलमहोत्सव; बालगोपाळ आणि तरुणाईचा उत्साह शिगेला

छावा –चौल| सचिन मयेकर |२९ जुलै २०२५ चौल येथील ऐतिहासिक श्री रामेश्वर मंदिराजवळील प्राचीन पुष्करणी (पाणवठा) यंदा वेळेपूर्वीच पाण्याने भरली असून, ती स्थानिकांसाठी जलक्रीडेचे केंद्र ठरली आहे. यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाल्याने, ही पुष्करणी लवकरच पाण्याने भरली आणि त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक लवकरच पोहण्यासाठी सज्ज झाली होती. सध्या परिसरातील बालगोपाळ आणि तरुणाई मनसोक्त जलक्रीडेचा आनंद…

Loading

Read More

रायगडमध्ये समुद्रात मोठी दुर्घटना – खांदेरी किल्ल्याजवळ मासेमारी बोट बुडाली, ५ जणांचा जीव वाचला, ३ जण बेपत्ता – शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू

रायगड – छावा मराठी, सचिन मयेकर रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक खांदेरी किल्ल्याजवळ आज सकाळी मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे. बोटीत एकूण ८ मच्छीमार होते. त्यातील पाच जणांनी पोहत किनाऱ्यावर येत आपला जीव वाचवला आहे, तर उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध…

Loading

Read More

तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर

आज, २६ जुलै — कारगिल युद्धाचा २६ वा स्मृतिदिन! ज्या रणभूमीत भारतीय शूरवीरांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले, त्या वीरांना “छावा – मराठी डिजिटल न्यूज नेटवर्क” व SMNEWS मराठी न्युज चॅनेल तर्फे वीरांना मानाचा सलाम! व मानाचा मुजरा! तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर लेखक – छावा – सचिन मयेकर…

Loading

Read More

श्रावण: सात्त्विकतेचा सुगंध, भक्तीचा संकल्प.

‘छावा’ संपादकीय | दि. २५ जुलै | सचिन मयेकर  पावसाच्या सरींनी निसर्ग हरित झाला आहे. नदी, नाले, डोंगर, झाडं, पक्षी आणि वातावरण नवजीवनाने बहरलेलं आहे. आणि अशा या निसर्गाच्या पुनर्जन्माच्या पार्श्वभूमीवर हिंदू संस्कृतीत सर्वाधिक पवित्र मानला जाणारा ‘श्रावण मास’ आजपासून सुरू होतोय. श्रावण हा केवळ एक महिना नसून शुद्ध सात्त्विक जीवनशैलीचा आरंभ, मनाला संयमात ठेवण्याचा…

Loading

Read More

गटारी अमावस्या: एक सांस्कृतिक आणि शास्त्रीय दर्शन

‘छावा’ संपादकीय | दि. २४ जुलै | सचिन मयेकर श्रावण सुरु होण्याआधीचा सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी अमावस्या. अनेक ठिकाणी या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असेही म्हणतात. सर्वसामान्यांच्या मनात या दिवसाची ओळख म्हणजे मज्जा-मस्ती, गोंधळ, मित्रांसोबत पार्टी आणि भरपेट मांसाहार असा असतो. मात्र या दिवसामागील मूळ अर्थ आणि परंपरा बऱ्याचदा…

Loading

Read More

अलिबाग-रेवदंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

चौल नाका, कुरुळ-नागाव परिसरात वाहतूक धोक्यात छावा दि. २१ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मोठ्या संकटाचे कारण ठरत आहे. खड्ड्यांमुळे गाड्या सतत आपटत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे….

Loading

Read More

संपादकीय भाग ४ -ज्यांनी स्मृती जपल्या – त्यांचं आपण काय केलं?

छावा, संपादकीय | दि. २० जुलै (सचिन मयेकर) रामदास बोट दुर्घटनेनंतर स्मारक, शासन आणि समाजाच्या प्रतिक्रियेचा लेखाजोखा मृत्यू लाटांमध्ये, स्मृती किनाऱ्यावर… १७ जुलै १९४७ रोजी समुद्रात बुडालेल्या ‘रामदास’ बोटीतून सुमारे ७०० हून अधिक जण कधीच परतले नाहीत. मात्र, त्यांची नावे परत आली – आठवणीतून, स्वप्नांतून, आणि कुठल्यातरी कोपऱ्यातल्या घरगुती देवघरातून. आज ७८ वर्षांनंतरही, ती घटना…

Loading

Read More