रविवार विशेष — स्वराज्याच्या थाळीतून उलगडणारे शिवकालीन विज्ञान आणि स्वावलंबन

रविवार विशेष


  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 रविवार , १० जानेवारी २६

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील जीवनपद्धती ही केवळ युद्धकौशल्यापुरती मर्यादित नव्हती तर ती आरोग्य संस्कृती स्वदेशी उद्योग आणि स्वावलंबन यांचा परिपूर्ण संगम होती त्या काळात महाराज स्वतः आणि सामान्य प्रजा अत्यंत साधेपणाने जेवत असत जेवणासाठी वापरली जाणारी भांडी ही आजच्या आधुनिक कारखान्यांतून नव्हे तर कुशल कारागिरांच्या हातातून घडत असत तांबे पितळ कांस्य माती आणि पानावर जेवण ही त्या काळाची ओळख होती

महाराजांच्या जेवणात तांब्याची आणि पितळेची भांडी वापरली जात असत कारण या धातूंमध्ये अन्न ठेवले असता ते शरीरासाठी हितकारक ठरते हे ज्ञान त्या काळी अनुभवातून विकसित झाले होते राजदरबारात प्रसंगी चांदीची भांडी वापरली जात असली तरी महाराजांचा दैनंदिन जीवनातील आग्रह साधेपणावरच होता दुसरीकडे सामान्य प्रजा मातीच्या भांड्यांत अन्न शिजवत आणि खात असे तर सणसमारंभ आणि सार्वजनिक जेवणात केळी किंवा पळसाच्या पानावर जेवण्याची परंपरा होती

आजच्या वाचकांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न असा की त्या काळात कोणत्याही कंपन्या नसताना पितळेची भांडी तयार कशी होत होती याचे उत्तर म्हणजे कारागीर समाज हीच त्या काळातील फॅक्टरी होती ठठेरा कसार लोहार यांसारखे समाज पिढ्यानपिढ्या धातुकाम करत आलेले होते तांबे आणि जस्त हे धातू ठराविक प्रमाणात मिसळून मातीच्या भट्ट्यांत वितळवले जात हातोड्याने ठोकून भांडी आकाराला आणली जात आणि नैसर्गिक साधनांनी घासून गुळगुळीत केली जात ही संपूर्ण प्रक्रिया मानवी कौशल्यावर आधारित होती

या भांड्यांसाठी लागणारा कच्चा मालही परदेशातून नव्हे तर भारतातील खाणींमधून मिळत असे राजस्थानातील खेतडी भागातून तांबे तर झावर परिसरातून जस्त मिळत असे भारतात जस्त शुद्धीकरणाचे तंत्र शिवकाळाच्या कित्येक शतके आधी विकसित झाले होते खनिजे बैलगाड्या उंट घोडे आणि नद्यांमधील होड्यांद्वारे व्यापारी मार्गांनी गावोगावी पोहोचवली जात स्वराज्याच्या हद्दीत व्यापाऱ्यांना संरक्षण आणि स्थिर करव्यवस्था असल्यामुळे हा व्यापार सुरळीत चालत असे

या सर्व व्यवस्थेमागे महाराजांची स्पष्ट भूमिका होती स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे कारागिरांना सन्मान देणे आणि स्वदेशी उत्पादनांवर भर देणे त्यामुळे भांडी शस्त्रे नाणी आणि दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू या सर्व स्वराज्याच्या मातीतूनच निर्माण होत होत्या आज आपण ज्या गोष्टी आधुनिक विज्ञान म्हणून मिरवतो त्या शिवकाळात अनुभवाधारित ज्ञान म्हणून जगल्या जात होत्या

स्वराज्याची थाळी ही केवळ जेवणाची नव्हती ती आरोग्य शिस्त पर्यावरण आणि आत्मनिर्भरतेची ओळख होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा काळ हा केवळ इतिहास नव्हे तर आजच्या काळासाठीही मार्गदर्शक ठरतो

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *