पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)

शेतीचे आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये भात व नाचणी पिकांचा समावेश असून, शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा संरक्षण मिळणार आहे.

योजना वैशिष्ट्ये:

1. सर्वसमावेशक पीक – भात व नाचणी.

2. विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी (AIC).

3. सरसगट बाबी – हवामान, कीड-रोग यांसारख्या कारणांमुळे उत्पादनात घट झाल्यास संबंधित महसूल मंडळाच्या उत्पादन अहवालानुसार नुकसान भरपाई मिळेल.

4. हमी उत्पादन – मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाचा विचार करून ५०% हमी उत्पादन ठरवले आहे.

5. विमा हप्ता भरायची अंतिम तारीख – ३१ जुलै २०२५.

पीकनिहाय माहिती:

पीक जोखमीचा स्तर (%) विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) विमा हप्ता दर (%) विमा हप्ता रक्कम (रु./हे.)

भात ३० ₹48,000/- 1.5% ₹720
नाचणी ३० ₹30,000/- 2% ₹600

अर्ज कसा कराल?

जवळच्या कोरे शेतकरी सेवा केंद्रात (CSC) जाऊन किंवा

ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करा.

आवश्यक कागदपत्रे:

7/12 उतारा

आधार कार्ड

बँक पासबुक

सामाजिक घटकाचा दाखला (आवश्यक असल्यास)

लक्षात ठेवा:

नुकसानीनंतर ७२ तासांत मोबाईल अ‍ॅप/सीएससी सेंटर/तालुका कृषी कार्यालयात तक्रार नोंदवा.

e-पिक पाहणी व अ‍ॅग्रोस्टॅक (Agristack) अनिवार्य आहे.

कृषी योजनेचा हेल्पलाइन क्रमांक: १४४४७

अधिक माहितीसाठी संपर्क करा:
कृषी अधिकारी श्री. निलेश पाटील
९६५७५६१९२९

आपल्या गावातील तलाठी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशीही संपर्क साधावा.

शेतकरी बांधवांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा!

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *